स्वतःच्या आयुष्याला, स्वतःपुरते मानू नये,
त्रास देणाऱ्या विषयांना, त्रास होण्याइतके ताणू नये,
क्षणभंगुर जीवनात, सारी दुःखे क्षुल्लक आहेत,
साऱ्यांना पुरून ऊरू, जोवर आपल्यांचे प्रेम शिल्लक आहे
- कवी विद्यानुज
कोणाचा दोष नव्हता कधी, अपघात होत राहिले,
पूर्व कल्पना असो वा नसो, आघात होत राहिले,
आले गेली माणसे, घर आबाद बरबाद होत राहिले,
साऱ्या आठवणी घेवून, जीवन पुढे जात राहिले
- कवी विद्यानुज
झिडकारून रक्ताचा गर्व, गीते नवी रचू पाहतो,
नाकारून भेदभाव सर्व, वाट नवी बनवू पाहतो,
दिखावू मानापमानाच्या, चिंता हव्या कशाला,
माणसांना माणसांपासून, तोडणाऱ्या परंपरा जपाव्या कशाला
- कवी विद्यानुज
अंतरीच्या वेदना, कविता बनून भेटल्या,
यमकांच्या शृंगाराने, मनमोहक भासल्या,
हसलो,रडलो,चिडलो,त्यांना कडकडून भेटलो,
स्वतःशी का होईना, मनमोकळे बोललो
- कवी विद्यानुज
No comments:
Post a Comment